भारतातील सात बहिणी कोणत्या आहेत ? कोणत्या राज्यांना सात बहिणी म्हटले जाते ? Seven Sisters States..
भारताच्या ईशान्य कडे असलेल्या सात राज्यांच्या समूहाला भारतातील सात बहिणी ( Seven Sisters India ) असे म्हटले जाते. सिक्कीम या राज्याला या सात बहिणींचा भाऊ ( brother state) मानले जाते. भारताचा हा ईशान्येकडील भाग म्हणजेच या सात बहिणी असलेले राज्य तिथे असलेल्या जनजातींमुळे ओळखले जातात..
या सात बहिणींच्या राज्यसमूहात खालील राज्यांचा समावेश आहे.
अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, नागालँड.
या सात राज्यांच्या राजधानी पुढील प्रमाणे आहेत :
- अरुणाचल प्रदेश – इटानगर
- आसाम – दिसपुर
- मणिपूर – इंफाळ
- मिझोराम – आइजोल
- त्रिपुरा – अगरतला
- मेघालय – शिलाँग
- नागालँड – कोहीमा